Navigation |
श्रीगुरुजी आणि समरसतेचा आचार- श्री. रामभाऊ बोंडाळे श्रीगुरुजींच्या घरचे वातावरणही समरसतेला अनुकूल होते. श्रीगुरुजी वडिलांना 'भाऊजी' म्हणत असत. ते सुरुवातीच्या दिवसांत खेडयामध्ये शिक्षक होते. त्यावेळी त्यांच्या घरी शंका विचारायला किंवा पाठ समजून घ्यायला विद्यार्थी आला की त्याची जात विचारात न घेता जवळ बसून त्याला शिकवीत असत आणि तेही नि:शुल्क. आई, 'ताई' सुध्दा खेडयांत कोणी महिला आजारी असेल तर तिच्या जातीचा विचार न करता तिची विचारपूस औषधपाण्याची व्यवस्था करण्याकरीता तिच्या घरी जात असत. पुढे संघाच्या कामासाठी अनेक जाती, भाषाभाषी स्वयंसेवक येत. त्यांचे चहापाणी, खाणेपिणे, जेवण सर्वांच्याबरोबर एकाच पंक्तीत होत असे. श्रीगुरुजी बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिकत असताना एक तथाकथित अस्पृश्य विद्यार्थी त्यांना भेटला व त्याची जेवणाची व्यवस्था करता येईल का? अशी विचारणा त्याने केली. श्रीगुरुजींनी भोजनालयामधील इतर विद्यार्थ्याचे मन वळवून मेसमध्ये सर्वांबरोबर जेवणाची नि:शुल्क व्यवस्था केली. त्याचे शुल्क बाकी सारे भरत असत. ही व्यवस्था दोन वर्षे चालू होती. (श्रीगुरुजी समग्र दर्शन खंड ५ - पृ. १५२). एकसंध समाज श्रीगुरुजी प्रवृत्तीने आणि वातावरणाने समरसता जगणारे होते. संघामध्ये त्यांना असेच समरसतेचे स्वाभाविक वातावरण दिसल्यामुळेच ते संघात रमले, अन्यथा ते रमले नसते असे पुष्कळ वेळा मला वाटते. महारवाडयात बामण हे दाढीवाले कोण? 'मी' तुमच्यासारखाच आहे पंडित कवाडे गहिवरले संपूर्ण समाजाचे संघटन श्रीगुरुजी नेहमी म्हणत असत की, संघाला संपूर्ण समाजाचे संघटन करायचे आहे. समाजातील काही लोकांचे संघटन करून त्या शक्तीचा उपयोग जबरदस्तीने परिवर्तन घटविण्याचे आपले काम नाही. संघाने केला बाबासाहेबांचा प्रचार भंडारा जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवक बाबासाहेबांच्या प्रचारकार्यासाठी प्राणपणाने हिंडू लागले. अर्थातच या निवडणुकीत बाबासाहेब जरी हरले तरी त्यांनी जेव्हा आकडयांचे विश्लेषण केले; कुठून किती मते मिळाली ते पडताळून पाहिले, तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की, त्या सांसदीय क्षेत्रांत अस्पृश्यांची एकूण जितकी मते होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मते त्यांना मिळाली आहेत. सवर्णातीलही अनेकांनी त्यांना मतदान केले आहे. त्यामुळे त्यांना संतोष झाला. पुढे नागपुरातील दीक्षाविधीच्या दुसर्या दिवशी नागपुरातील शे. का. फेडरेशनचे पुढारी त्यांना भेटायला आले. त्या मंडळींना बाबासाहेब म्हणाले, ''तुम्हा लोकांना राजकारणात अधिक रुची आहे. मी भंडार्याची निवडणूक हरलो त्याचे मला दु:ख नाही, कारण मी हरणार याची मला सुरुवातीपासूनच कल्पना होती, परंतु मला एक गोष्ट फार चांगली वाटली. अस्पृश्य आणि सवर्ण समाज यांच्यामध्ये मला तटबंदी दिसत होती ती या भंडार्याच्या निवडणुकीत तुटून गेली. या निवडणुकीत मला अस्पृश्यांव्यतिरिक्त सवर्णांचीही बरीच मते प्राप्त झाली. यापुढे आपण आपला विचार बदलला पाहिजे. केवळ अस्पृश्य व मागासवर्गीयांसाठीच संघटन न बनवता आम्हाला सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम बनविले पाहिजेत.'' अर्थात अस्पृश्य व सवर्ण यांत जी तटबंदी होती ती तुटली होती. हा सर्व श्रीगुरुजींनी सामाजिक अभिसरणाचा संघाच्या व्यापक ध्येयवादाच्या अनुषंगाने केलेल्या रणनीतीच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा परिणाम होता. या निवडणुकीतील अनुभवामुळे नव्या राजकीय व्यूहरचनेचा बाबासाहेबांच्या मनातील विचार पक्का होऊ लागला. त्याचीच परिणती म्हणजे 'शेडयुल्ड क्लास फेडरेशन' या नावाचा त्याग करून सर्व समावेशक अशा 'रिपब्लिकन' पक्षाची १९५६ मध्ये स्थापना केली. दुर्दैवाने त्यानंतर काही महिन्यांतच बाबासाहेब बुध्दवासी झाल्यामुले हिंदू समाजातील सामाजिक अभिसरणाची क्रिया मंद झाली.'' पंतप्रधानांचा अपमान : राष्ट्राचा अपमान वनवासी व बाकीचा हिंदू समाज यांच्या समरसता, एकात्म प्रस्थापित करण्यासाठी रामटेकला वकिली करीत असलेल्या बाबासाहेब देशपांडेंना १९५२ ला जशपूरला पाठविले. त्यांच्या मदतीसाठी मोरूभाऊ केतकर या प्रचारकाला पाठविले व १९५२ साली ५ विद्यार्थ्यांनीशी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. श्रीगुरुजींच्या निर्वाणापर्यंत जवळजवळ प्रत्येक प्रांतात वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाची सुरुवात होऊन त्या कामाने गती प्राप्त केली होती. वनवासींच्या कामाला आणखी गती देण्यासाठी विद्यार्थी परिषदेतर्फे नागालँड, मिझोराम आदी पूर्वांचल क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना उर्वरित भारतातील स्वयंसेवकांच्या घरी ठेवून त्यांचे शिक्षण इकडच्याच शाळेत करावे असा प्रकल्प श्रीगुरुजींच्या प्रेरणेने सुरू झाला. जेथे चांगल्या शाखा व शिक्षणाची चांगली सोय आहे असा गावांतील आपल्या स्वयंसेवकांकडे, ही मुले घरच्यासारखी राहिली. घरचे रीतिरिवाज पाहून यापैकी बर्याचशा रीतिरिवाजांचे पारंपरिक रीतिरिवाजांशी साम्य आहे हे त्यांच्या मनात ठसले व प्रत्यक्ष अनुभूतीमुळे आपले सार्यांचे जीवन एक आहे, समान आहे ही भावजागृती त्यांच्यात आली. सुट्टयांमध्ये ते घरी जात त्यावेळी त्यांना भेटणार्या सर्वांना येथील स्वयंसेवकांच वागण्याची, आपलेपणाची प्रशंसा ही मुले करीत त्यामुळे हळूहळू अलगाववादाचा प्रभाव कमी होऊ लागला. आता तर ही संख्या इतकी वाढली आहे की, त्यांचे छात्रावास भारताच्या अन्य भागांत मोठया प्रमाणात सुरू झाले आहेत. याशिवाय वनवासी भागांत मोठया प्रमाणावर प्रचारक पाठविले गेले. त्यांच्या प्रयत्नाने शाखा, शाळा, वसतिगृहे आदी विविध संस्कारोपयोगी उपक्रम चालू झाले. या सर्वांचा परिणाम होत आहे. अलगाववादाचा जोर कमी होऊ लागला आहे. भारतीय जीवनाशी समरसता वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेची स्थापना श्रीगुरुजींनी मोठया प्रयत्नाने संतांना जोडून ठेवले. त्यांच्या मनावर बिंबवले की, आता मठांत बसून राहणे योग्य नाही. आपल्या पंथ, मताचा अत्याग्रह न धरता सामंजस्य दाखवून ऐक्य राखणे, संतांनी समाजाचा विचार करण्याची समाजाला योग्य गोष्टीसाठी प्रेरित करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले नाही तर समाजच राहणार नाही आणि मग मठे किंवा पंथ कसे राहतील? श्रीगुरुजींच्या सतत चालू असलेल्या भेटी, पत्रव्यवहार, त्यांच्या या विचाराला अनुकूल असलेल्यांना कार्यप्रवृत्त करणे यातून योग्य वातावरण तयार झाले. आमचा मठ सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे मी सर्वांच्या बरोबर बसणार नाही, हा आग्रह मिटले. सर्व समान व्यासपीठावर बसायला तयार झाले. एकमेकांच्या मठात जाण्यात कमीपणा वाटत होता तो गेला व एकमेकांकडे जाऊ लागले व ही संतशक्ती समाजाच्या कामी येऊ लागली. प्रयागच्या सम्मेलनांत 'न हिंदू पातीतो भवेत्' या मिळालेल्या मंत्रामुळे परधर्मात गेलेल्यांचे 'स्वगृही येण्याचा प्रवाह सुरू झाला आणि १९६९ च्या उडुपी सम्मेलनात 'हिन्दव: सोदरा सर्वे' म्हणजे सर्व हिंदू भाऊ आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, सर्व समान, त्याहूनही सर्व बंधू, आत्मीय हा ठराव पेजावर स्वामींनी मांडला. एवढयावरच न थांबता पेजावर स्वामी दलित वस्तीत गेले तेथील लोकांना भेटले. त्यांच्या घरांत गेले. त्यांच्या काही जुनाट वळणाच्या शिष्यांनी विरोध केला, पण त्यांनी पर्वा न करता हा क्रम चालूच ठेवला. श्रीगुरुजी स्वयंसेवकांना तर वारंवार प्रेरणा देत होतेच. त्यांच्या प्रयत्नांना साधूंच्या प्रयत्नांची साथ मिळाल्याने त्यांचाही उत्साह वाढला. सर्व जातीच्या लोकांना संस्कृत, वेद आदींच्या अध्ययनासाठी मुक्तता लाभली. -------------------------------------------- |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |