Navigation |
भारतभूमीचा विस्तारहिंदू राष्ट्रविचाराची मांडणी करताना हेच पहिले सत्य ते विस्ताराने विशद करीत असत. उत्तरेला हिमालयाच्या पर्वतराजीच्या ज्या समस्त शाखोपशाखा विस्तारलेल्या आहेत, तेथपासून तो दक्षिणेकडील सागरापर्यंत, तसेच पूर्व-पश्चिम सागरापर्यंत आपल्या या भूमीचा विस्तार आहे. अनेक प्राचीन ग्रंथांतील आधारांसह मोठया रसाळपणे आपल्या या सुनिश्चित सीमा असलेल्या भूमीचे अतिभावपूर्ण वर्णन ते करीत. नंतर ते या भूमीच्या एकेका कणात पावित्र्य कसे ओतप्रोत भरलेले आहे, हेही साधार सांगत. मातृभूमीच्या पावित्र्याचे वर्णन करताना त्यांच्या भावनांना उधाण येई व उंचबळणाऱ्या भक्तिभावनेने वाणीत अवर्णनीय आर्द्रता येई. ही भूमी म्हणजे जड दगडधोंडे नसून चैतन्यमय, जीवमान जगन्माताच आहे व तिचे अखंडत्व, मांगल्य, गौरव यांची प्राणपणाने जपणूक आपण या मातेच्या लेकरांनी केली पाहिजे, असा कर्तव्यबोध ते करून देत. आपल्या पूर्वजांनी केलेला भारताचा विस्तार सांगताना - |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |